उत्तम मारुती कांबळे (जन्म 1956) ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘श्राद्ध’, ‘अस्वस्थ’, ‘नायक’ या कादंबèया, ‘रंगमाणसांचे, ‘कथा माणसांच्या’, ‘कावळे आणि माणसं’, ‘परत्या’, ‘न दिसणारी लढाई’ हे कथासंग्रह तसेच ‘देवदासी’ आणि ‘नग्नपूजा’, ‘भटक्याचे लग्न’, ‘कुंभमेळा’ अनिष्ट प्रथा हे संशोधनपर ग्रंथ तसेच ‘जागतिकीकरणात माझी कविता’, ‘नाशिका तू एक सुंदर कविता’, ‘पाचव्या बोटावर सत्य’ हे कविता संग्रह आणि ‘आई समजून घेताना’ व ‘वाट तुडवताना’ ही आत्मकथने तसेच ‘थोडस वेगळं’, ‘तिरंग्यातून गेला बाप’ ही ललित पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी अनेक ग्रंथाचे संपादन केले आहे. ‘आई समजून घेताना’ या पुस्तकाचे कन्नड, इंग्रजी व ब्रेल लिपीत रूपांतर झाले आहे. यांनी 2010 साली ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा