यशवंत दिनकर पेंढारकर (1899-1985) रविकिरण मंडळातील प्रमुख कवी होते. बडोदा संस्थानचे राजकवी. महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून सन्मान. स्फुट कविता, खंडकाव्य, महाकाव्य, लघुनिबंध इ. स्वरूपाचे लेखन. ‘यशोधन’, ‘यशोगंध’ हे कवितांचे संग्रह. ‘बंदिशाळा’, ‘जयन्मंगल’ इ. खंडकाव्ये आणि ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य प्रसिद्ध आहे. कौटुंबिक व सामाजिक भावनांचा आविष्कार, गेयता, सुबोधता आणि शाश्वता जीवन मूल्यांचा पुरस्कार ही काव्यलेखनाची वैशिष्ट्ये. आपल्या काव्य गायनाने कविता महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचविली. 1950 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
मूल्य : व्यक्तिमाहात्म्य
साहित्य प्रकार : विभूतिगौरव
संदर्भ ग्रंथ : यशोधन
मूल्य : व्यक्तिमाहात्म्य
साहित्य प्रकार : विभूतिगौरव
संदर्भ ग्रंथ : यशोधन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा